Sunday, May 28, 2017

जीवन परिस्थिती



"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे" असे बालकवी म्हणतात. आपण हि कविता लहानपणी शाळेत ऐकली आणि अनभवलीत सुद्धा.  खरंच किती सुंदर जीवन असते लहानपणीचे, पण हे जीवन प्रत्येकाच्या वाट्याला येते का हो? ते आनंदी जीवन सगळ्यांना भेटते का हो?

मी ऑफिसला किंवा ऑफिस वरून घरी जात असतानी सिग्नल वर थांबताना आजू बाजूला सहजच नजर जाते, काही लहान मुले भीक माघतानी दिसतात. किती वाईट परिस्थिती असते. त्यांना चौकच घर माणून राहावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भीक मागावी लागतेय, १/२ रु. मिळतात आणि त्यावरच काहीतरी खाऊन रात्र काढावी लागते. कपडे नसताना हि ऊन, वारा, पाऊसात  ते भीक मागतात.

या मुलांना "अ आ इ " काय,  शाळा सुद्धा असते हि गोष्ट पण माहित नाही. त्यांच्या जीवनाची पाटी कोरी आहे. "डिजिटल इंडिया" च्या जगात ही मुले "virtually" जीवन जगतात. आपल्याला ठेच लागली तर आपण "आई गं" म्हणतो. पण यांच्या जीवनात अशी ठेच लागली आहे ज्याने त्यांना ""आई गं", "बाप रे" तर सोडाच "आरे देवा" पण म्हणू शकत नाही. खरंच त्यांची परिस्थिती त्यांना भिक मागायला भाग पाडते.  त्यांना जीवनात काही तरी करायची इच्छा असते. पण शेवटी नियती पुढे काही नाही. त्यांना जीवनात फार मोठी भरारी घेईची आहे. यासाठी कुणी तरी पाठीशी उभे राहून काडीचा आधार देण्याची गरज आहे. ती मुले आपली शिक्षण घेऊन काही तरी जीवनात वेगळे पण घडून आणू शकतात. आपले जीवन संपले असे त्यांना वाटायला नकोय.

काही मुलांचा खूप हेवा वाटतो कि काही तरी खेळणी विकून, रोजी रोटी साठी पैसे मिळवतात. पण याने त्याचे आयुष्य वेर्थ जाणार आहे. त्यांची कळी खुलण्या आधीच कोमेजून जाणार आहे. "स्वच्छ भारत-सुंदर भारत" "स्वस्थ भारत" या सोबत "साक्षर भारत" सुद्धा म्हणावे लागेल. 






स्थळ- सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक,  दि.- ७/१०/२०१६, सायं. ८ वाजता



 

स्थळ- सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक,  दि.- २७/१०/२०१६, सायं. ६.५० वाजता







स्थळ- खराडी, पुणे,  दि.- /१०/२०१, सकाळी ११ वाजता